(मंचाचे निर्णयान्वये, सौ. मोहिनी जयंत भिलकर, सदस्या)
(पारीत दिनांक : 29 एप्रिल 2011)
अर्जदार यांनी सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
... 2 ... (ग्रा.त.क्र.1/2011)
1. अर्जदार मय्यत चिन्नना लच्छमच्या कुमरी यांची पत्नी असून, चिन्नन्ना याचा दि.8.10.06 रोजी खून झाला. या अपघाती मृत्युमुळे अर्जदाराने शेतकरी अपघाती विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळण्याबाबत गैरअर्जदार क्र.3 तहसिलदार यांचे मार्फतीने दि.7.12.06 ला अर्ज सादर केला होता. सदरहू दावा अर्जा सोबत अर्जदाराने आवश्यक दस्तावेज सुध्दा गैरअर्जदाराकडे पाठविले होते. गैरअर्जदार क्र.2 चे मागणी प्रमाणे तहसिलदार सिरोंचा यांनी दि.27.6.07 ला अर्जदाराला कळविले की, आबासाहेब खोडकर सभागृह, जि.प.कार्यालय, नागपूर येथे हजर होणे आहे. त्याप्रमाणे, अर्जदार हजर राहिला व सर्व कागदपञाची पुर्तता केली. तेंव्हा संबंधीतांनी अर्जदाराला एक ते दिड वर्ष वाट पाहण्यास सांगीतले. परंतू, अजुनपावेतो वाट पाहून सुध्दा नुकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही, करीता अर्ज दाखल करावा लागला. अर्जदार हा गैरअर्जदारांचा ग्राहक आहे आणि गैरअर्जदाराने अर्जदाराचा दावा नामंजूर करुन सेवा देण्यास ञुटी केली आहे. त्यामुळे, अर्जदाराने, मुळ दावा रुपये 1,00,000/- व त्यावरील दि.7.12.06 ते 7.12.10 पर्यंतचे व्याज रुपये 48,000/-, दावा दाखल करण्याचा खर्च रुपये 10,000/-, मानसिक ञासापोटी व तक्रार दाखल करण्याचा खर्च रुपये 30,000/- असे एकूण रुपये 1,88,000/- गैरअर्जदाराने अर्जदाराला अदा करण्याचा आदेश देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
2. अर्जदाराने नि.4 नुसार 21 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आला. गैरअर्जदार क्र.1 ने नि. 11 नुसार लेखी बयान दाखल केले. गैरअर्जदार क्र. 2 ने नि. 10 नुसार लेखी बयान दाखल केले. गैरअर्जदार क्र. 3 ने नि.9 नुसार लेखी बयान व दस्ताऐवज दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ने लेखी बयानात नमूद केले की, अर्जदाराची तक्रार ही बनावट व असत्य आहे. अर्जदाराचे हे म्हणणे खोटे आहे की, दि.8.10.06 रोजी चिनन्ना लछमय्या कुमरी ह्याचा खून करण्यात आला व तो नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या गोळ्या घालून केला होता. हे म्हणणे सुध्दा पूर्णतः असत्य व खोटे आहे की, एक ते दिड वर्षापर्यंत प्रोत्साहन भत्ता मिळण्यासाठी अर्जदारास वाट पाहण्यास सांगण्यात आले होते. अर्जदाराला रुपये 1,88,000/- देण्याची गैरअर्जदाराची कोणत्याही प्रकारे जबाबदारी नाही. तसेच ती रक्कम मिळण्यासाठी अर्जदार पाञ नाही. वास्तविक, अर्जदाराने विमा पॉलिसीच्या अटी व शर्ती प्रमाणे आवश्यक त्या कागदपञाची पुर्तता केली नाही व जवळपास 10 महिण्यानंतर म्हणजेच दि.27.6.07 पर्यंत आवश्यक ती कागदोपञी पुरावे गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे सादर केले नाही. ज्याअर्थी अर्जदाराने स्वतःच्या हित संरक्षणार्थ वेळीच योग्य ती दखल घेतली नाही व कृतीहीन राहील. त्याअर्थी तिला कोणत्याही प्रकारचा खर्च व व्याज, गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून मागण्याचा काही एक हक्क व अधिकार नाही.
... 3 ... (ग्रा.त.क्र.1/2011)
4. गैरअर्जदार क्र. 2 ने लेखी बयाणात नमुद केले की, महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबवण्यासाठी विना मोबदला सहाय्य करतो, शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/ तहसिलदार मार्फत आमच्याकडे आल्यावर विमा दावा अर्ज योग्यपणे भरला आहे कां ?, सोबत जोडलेली कागदपञे विमा कंपनीने मागणी केल्याप्रमाणे आहे कां ?, नसल्यास तालुका कृषीधिकारी, तहसिलदार यांना कळवून त्यांची पुर्तता करवून घेणे व सर्व योग्य कागदपञे मिळाल्यावर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडून दावा मंजुर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे, एवढाच आहे. योग्यत्या दोषी कडून कारण नसतानांही तक्रारीस सामोरे जाण्यास भाग पाडल्याने या अर्जाचा खर्च रुपये 5,000/- देण्याचा आदेश व्हावा, तसेच तक्रारीतून गैरअर्जदार क्र.2 ची निर्दोष मुक्तता करण्यात यावी, अशी मागणी केली.
5. गैरअर्जदार क्र. 3 ने लेखी बयानात नमूद केले आहे की, श्रीमती कुमरी मलक्का वि.चिनन्ना , रा. ग्लासफोर्डपेठा हीचे पती श्री चिनन्ना लस्मय्या कुमरी याचा दि.8.10.06 रोजी खून झाला. या अपघाती मृत्युमुळे अर्जदाराने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळणेस विहीत नमुन्यातील दावा प्रकरण मंजूरी करीता या कार्यालयाचे पञ क्र.कावि/कलि/सामान्य/1726/2006, दि.6.12.06 अन्वये व्यवस्थापक कबाल इंशुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. प्लॉट नं.11 लाभेश्वर हाऊस, डागा ले आऊट, नार्थ अंबाझरी रोड, नागपूर -440010 यांचेकडे सादर करण्यात आला.
6. अर्जदार व गैरअर्जदार क्र.1, 2 व 3 यांनी दाखल केले दस्ताऐवज, शपथपञ व उभय पक्षांचे वकीलांनी केलेल्या युक्तीवादावरुन खालील कारणे व निष्कर्ष निघतात.
// कारणे व निष्कर्ष //
7. अर्जदार हिचा पती चिनन्ना लच्छमय्या कुमरी यांचा दि.8.10.2006 रोजी खून झाला असल्याचे दाखल पोलीस दस्ताऐवजावरुन दिसून येते. अर्जदार ही मृतकाची वारसदार पत्नी असल्यामुळे क्लेम फार्म सोबत सर्व दस्ताऐवज जोडून गै.अ.क्र.3 कडे प्रस्ताव सादर केला. परंतू, नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे अर्जदाराने तक्रार दाखल केली आहे.
8. गै.अ.क्र.1 यांनी आपल्या नि.क्र.11 वरील लेखी बयानातील विशेष कथनात असे सांगीतले की, मृतकाचा मृत्यु हा आपसी संबंधातील वादातून संघर्षामुळे झालेल्या दुर्घटनेत झाला, त्यामुळे मृतकाच्या वारसाला/अर्जदाराला विमा योजने अंतर्गत लाभ देय होवून शकत नाही. परंतू, मृतकाचा मृत्यु हा बंदुकीच्या गोळ्या लागून झाला आणि बंदुकीच्या गोळ्यांनी मृत्यु होणे म्हणजेच नैसर्गीक मृत्यु नसून अपघाती किंवा आकस्मीक
... 4 ... (ग्रा.त.क्र.1/2011)
मृत्यु होय. त्यामुळे, अर्जदार ही अपघात विमा योजनेचा लाभ मिळण्यास पाञ आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे.
9. गै.अ.क्र.2 यांनी पाठविलेला नि.क्र.10 लेखी बयान शपथपञा शिवाय असल्यामुळे ग्राह्य धरण्यास पाञ नाही. ते लेखी बयानात सांगतात की, सदर प्रस्ताव तहसिलदार यांचेकडून योग्य त्या कागदपञांची पुर्तता करवून सर्व कागदपञे मिळाल्यावर विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडून मंजूर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे एवढेच काम गै.अ.क्र.2 यांचे आहे, नि.क्र.4 अ-21 अन्वये कबाल इन्शुरन्सचे तहसिलदारांना आलेले पञ व त्यानुसार दि.5 जुलै 2007 रोजी नागपूर येथे मा.कृषीमंञी यांचे अध्यक्षते खालील योजनेची आढावा बैठकी नुसार दि.15 जुलै 2006 पासूनच्या दाव्यातील ञुटींची पुर्तता करण्यासाठी अर्जदारांना बोलावले होते, असे पञ रेकॉर्डवर दाखल आहे. अर्जदाराला तेंव्हा एक दिड वर्ष वाट पाहण्यास सांगीतले होते. परंतू अजुनपावेतो दाव्याचा लाभ मिळाला नाही ही गै.अ.क्र.1 यांच्या सेवेतील ञुटी आहे.
10. गै.अ.क्र.3 ने नि.9 नुसार लेखी उत्तर दाखल केले, त्यात असे मान्य केले की, अर्जदाराकडून नुकसान भरपाई संदर्भात प्राप्त झालेला प्रस्ताव त्याचे कार्यालयीन पञ क्र.कावि/कलि/सामान्य/1726/2006, दि. 5/6.12.2006 नुसार गैरअर्जदार क्र.2 च्या कार्यालयात पाठविण्यात आला. गैरअर्जदार क्र.3 ने दाखल केलेल्या दि.6.12.2006 च्या पञाचे अवलोकन केले असता, गैरअर्जदार क्र.2 ला पान क्र. 1 ते 52 पर्यंतचे कागदपञे पाठविल्याचे नमूद आहे. शासन परिपञकानुसार राज्यातील कोणत्याही नैसर्गीक आपत्तीने होणा-या अपघातात त्याचे कुंटूंबातील कमावता पुरुष मरण पावल्याने आर्थिक अडचण होऊ नये म्हणून शासनाने उदात्त हेतूने ही योजना अंमलात आणली. गैरअर्जदाराने प्रस्ताव सादर केल्यावर अर्जदार लाभधारक असल्याने शेतकरी विमा योजनेअंतर्गंत लाभ मिळण्यास पाञ आहे. अर्जदाराने सर्व दस्ताऐवज गैरअर्जदार क्र.3 कडे दिले व गैरअर्जदार क्र.3 यांनी पूर्ण दस्ताऐवज जोडून प्रस्ताव गैरअर्जदार क्र.2 कडे सादर केला. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांनी अर्जदाराचा प्रस्ताव सर्व दस्ताऐवजासह गैरअर्जदार क्र.1 याचेकडे पाठवून योग्य ती सेवा दिली आहे. त्यामुळे, त्यांच्या सेवेत न्युनता आहे असे म्हणता येत नाही. त्यामुळे त्यांचे विरोधात तक्रार खारीज होण्यास पाञ आहे.
11. गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार यांचा दावा नामंजूर केला. परंतु योग्य ती कागदपञे शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे दाव्यासोबत जोडून पाठवलेले गैरअर्जदार क्र.3 यांच्या दि.6.12.2006 च्या पञावरुन, तसेच रेकॉर्डवरुन दिसून येते. यावरुन, गैरअर्जदार क्र.1 यांनी, बेकायदेशिरपणे काहीही न कळविता आजपर्यंत अर्जदारास विमा दाव्याच्या लाभापासून वंचीत ठेवून, अर्जदारास सेवा देण्यात ञुटी केली असल्याचे सिध्द होते, या निष्कर्षाप्रत हे न्यायमंच आलेले आहे.
... 5 ... (ग्रा.त.क्र.1/2011)
12. वरील कारणे व निष्कर्षा नुसार तक्रार मंजूर करण्यास पाञ आहे, या निर्णयाप्रत हे न्यायमंच आले असल्यामुळे तक्रार मंजूर करुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यांत येत आहे.
// अंतिम आंदेश //
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर.
(2) गैरअर्जदार क्र.1 ने, मृतक चिनन्ना लच्छमय्या कुमरी याचा अपघाती मृत्युबाबत शेतकरी विमा योजनेची रक्कम रुपये 1,00,000/- तक्रार दाखल दि.27.1.2011 पासून द.सा.द.शे. 9 % व्याजाने आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत अर्जदारास द्यावे.
(3) गैरअर्जदार क्र.1 ने, अर्जदारास झालेल्या मानसीक, शारीरक ञासापोटी रुपये 1500/- व ग्राहक तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 500/- आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत द्यावे.
(4) गैरअर्जदार क्र.2 व 3 चे विरुध्द तक्रार खारीज. त्यांनी आपआपला खर्च सहन करावा.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत देण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 29/4/2011.